हतनूर; पुढारी वृत्तसेवा : आंध्रप्रदेश येथून वाळलेली लाल मिरची घेऊन राजस्थानकडे निघालेला ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टापरगांव (ता. कन्नड) येथे शिवना नदीच्या पुलावरून नदीत कोसळला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. यात चालक पपू खान शमू खान (वय २२) व असलम खान कासम खान (वय २७) रा. कबीरनगर जोधपूर, राजस्थान हे जखमी झाले.
मालवाहतूक ट्रक क्रमांक (आर जे-१९ जी ई ६४७४) हा आंध्रप्रदेश येथून वाळलेली लाल मिरची घेऊन राजस्थानकडे जात होता. ट्रक छत्रपती संभाजीनगरकडून कन्नडकडे येत असताना हतनूर जवळ आले असता चालकाला डुलकी लागल्यामुळे शिवना पुलाचे कठडे तोडून पाण्यात पडला. यात ट्रक चालक आणि किनर जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.आर भालेराव, बीट जमादार संजय आटोळे, पोलीस नाईक कैलास करवंदे, सहाय्यक फौजदार शेषराव उबाळे, हर्षवर्धन काळे, शेख युसुफ, पोलीस मित्र संतोष ढोले तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
हेही वाचा :