औरंगाबाद : कर्जबाजारीपणाला कंटाळून वैजापुरात एकाची आत्महत्या | पुढारी

औरंगाबाद : कर्जबाजारीपणाला कंटाळून वैजापुरात एकाची आत्महत्या

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी (दि. 12) शहरातील पाटील गल्ली येथे घडली. प्रवीण जयराम उगले (वय 40) असे आत्महत्या करणार्‍या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण उगले हा शहरातील पाटील गल्ली येथे वास्तव्यास होता. जुने बसस्थानक परिसरात पानस्टॉल चालवून तो उदरनिर्वाह करायचा. मंगळवारी नेहमीप्रमाणे तो पानस्टॉलवर गेला. दरम्यान, दुपारी जेवणासाठी घरी परतला असता दुपारी तीनच्या सुमारास त्याने घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जाऊन स्कार्पने गळफास लावून घेतला. घटनास्थळी पोलिसांना प्रवीणने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत कर्जबाजारीपणामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले असल्याची माहिती सहायक फौजदार रज्जाक शेख यांनी दिली. अधिक तपास महिला पोलिस नाईक शिवकांता भुरे या करीत आहेत.

Back to top button