संगमनेर तालुक्यात विकासकामे सुरूच राहणार : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्यात विकासकामे सुरूच राहणार : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जनता व पक्षाच्या विश्वासामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली. त्यातून निळवंडेसह अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लावली. विकास कामाना शिंदे सरकारने स्थगिती दिली. विधानसभेत आवाज उठून आपण ती स्थगिती उठवली. अडचनी सोडवल्या जात असून तालुक्यातील विकास कामे सुरूच राहतील, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी – राजापुर ते चिकणी व राजापूर ते चिखली फाटा या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मा.आ. डॉ. सुधीर तांबे, आर. एम. कातोरे, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, सिताराम राऊत, संतोष हासे, नवनाथ आरगडे, चंद्रकांत कडलग, विष्णुपंत रहाटळ विलास वर्पे, आर. बी. सोनवणे, भारत वर्पे, माधव हासे, बाबासाहेब गायकर, आनंद वर्पे, सरपंच निर्मला राऊत, सरपंच ज्योती कडलग, उपसरपंच प्रमोद कडलग, सी. के. मुटकुळे, डी. एम. लांडगे, सोमनाथ गोडसे, अतुल कडलग, प्रकाश कडलग आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, राजापूर – घुलेवाडी रस्त्याची मागणी खूप दिवसांची होती. ती आता पूर्ण होत आहे. विकास कामे करताना ओढाताण होतच असते. तालुक्यातील प्रत्येक गावाला, वाडीला निधी द्यावा लागतो. मात्र विकास कामे करताना आपण कधीही कमी पडलो नाही. सत्ता नसली तरी सर्वाच्या सहकार्‍याने कामे मार्गी लावत असतो.

गाईच्या गोठ्यात मुरूम टाकायचा तरी हे खबरी ट्रक्टर पकडून देतात, कनोलीच्या तलाठ्याला मंत्री स्वत: फोन करतात की वाळू वाहतुक करून देवु नका, गौण खनिजाचा वापर सामान्य लोकाच्या विकास कामासाठीच होतो. मात्र त्याच्यावरही बंदी कसले राजकारण अशा राजकारणाचा आपल्या तालुक्यात काहीही उपयोग नाही. हा होणारा त्रास गणेश च्या निवडणुकीमुळे थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे.

निळंवडे धरणाचे व कालव्यांची कामे आपण अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केली. पिचडानी मदत केली. मात्र ज्याचे योगदान नाही त्यानी पाटाचे पाणी बंद केले. जनतेचा आनंद त्याना बघवला नाही. आपण जे करतो ते चागलेच करतो, आपला हेतु प्रामाणिक आहे. त्यामुळे जनतेने नेहमी विकासकामे करणार्‍याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, भाजप धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकारण करत आहे. यातुनच मणिपुर सारख्या माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटना घडत आहे. आ. थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यात रस्ते, निळवंडेचे पाट व विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पुढेही सुरुच राहतील. रोज एका राज्यात फोडाफोडी करून भाजप सरकार सत्ता हस्तगत करत आहे.

हे राजकारण सामान्य जनतेला मान्य नाही. यावेळी आर. एम. कातोरे, सरपंच ज्योती कडलग आदीनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कडलग यांनी केले. यावेळी परिसरातील नागरीक व महिला व विविध संस्थाचे पदाधीकारी, कार्यकर्त्ये , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news