राज्यसभा निवडणूक : भाजपने कितीही दावे केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील- जयंत पाटील

NCP Jayant Patil
NCP Jayant Patil
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसेवा : भाजपने कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

आज राज्यसभेसाठी मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. अपिलाचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा अशी अपेक्षा आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यसभा निवडणूक मतदानाला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदान केले. महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news