पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण 29 जुलैपासून सुरू होत आहे (Shrawan somwar 2022) आणि श्रावणाचा शेवटचा दिवस 27 ऑगस्ट आहे. श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीमध्ये महत्वपूर्ण स्थान आहे. श्रावण सुरु झाला की उपवासांची रेलचेल असते. या महिन्यात मासांहार (Nonvege) पूर्णपणे टाळून हलकासा आहार (Shravan Food) घेण्यावर लोकांचा भर असतो. श्रावण महिन्यात हलकासा आणि शाकाहार घेण्याला काही शास्त्रीय कारणे आहेत. ती कारणे नेमकी कोणती आहेत हे आपण पाहूया.