आपला देश सर्व क्षेत्रात पुढे चालला आहे. आपली अर्थव्यवस्थाही वेगाने पुढे जात आहे. टेक्नॉलॉजी, कृषी तसेच अनेक क्षेत्रातही मोठी प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश अव्वल स्थानी पोहोचला आहे. जी२० मध्ये भारताने केलेल्या आदरातीथ्याचं जगभर कौतुक होत आहे अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते.