पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आतापर्यंत १६ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी १६ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली. आता किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ वा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र पीएम किसानचा (PM Kisan Yojana) पुढचा हप्ता कधी येईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू आहे. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाली. या अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना एकाच वेळी ६ हजार रुपये देत नाही तर २ हजार रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये देते.
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी e-KYC करणे अनिवार्य आहे. e-KYC केली नसेल तर आजच पूर्ण करा, न केल्यास तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.
हेही वाचा :