पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बाराही तालुक्यातील १८६ पंचायतीसाठी अर्ज भरण्याच्या आज (दि.१८) पहिल्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राज्यातील १८६ पंचायतीच्या निवडणुका १० ऑगस्ट रोजी होत आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
राज्यात एकूण १९० पंचायती असून ज्या १८६ पंचायतीचा कार्यकाल संपलेला आहे. त्या पंचायतीसाठी १० ऑगस्ट रोजी मतदान मत पत्रिकेद्वारे होणार आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया तालुक्यातील मामलेदार कार्यालयांमध्ये सुरू झाली आहे.
आज पहिल्या दिवशी डिचोली तालुक्यातून २, बार्देश तालुक्यातून १, तिसवाडी तालुक्यातून २, साष्टी तालुक्यातून २, केपे तालुक्यातून २ व काणकोण तालुक्यातून १ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ जुलै आहे.
हेही वाचलंत का ?