पुढारी ऑनलाईन : १४ विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणांविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि.५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. दरम्यान ईडी, सीबीआयचा केंद्राकडून होत असलेल्या दुरूपयोगावरील विरोधकांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची ही याचिका फेटाळली आहे.
तपास संस्थांच्या दुरुपयोगामुळे (Misuse of ED and CBI) लोकशाही धोक्यात आली असल्याचे काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तपास संस्थानी ज्या कारवाया चालविलेल्या आहेत, त्यात ९५ टक्के नेते विरोधी पक्षांचे आहेत. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व आणि अटकेत्तर मार्गदर्शक तत्वे आखणे आवश्यक बनले असल्याचे सिंघवी यांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे तपास संस्थांचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप करत ८ राजकीय पक्षांच्या ९ नेत्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.