या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात मूर्तीच नाही. त्या बाबतीत बऱ्याच अख्यायिका सांगितल्या जातात. एका धार्मिक ग्रंथानुसार अशी अख्यायिका आहे की, भगवान महादेव यांचा देवी सतीप्रती असलेला मोहभंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीदेवीच्या मृत तुकड्याचे तब्बल ५१ भाग केले. अवयवाचे तुकडे ज्या ज्या भागात पडले ती ठिकाणे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्धीस आली.