कामाख्या देवीच्या आशीर्वादाने जनतेच्या मनातलं सरकार आलं, मुख्यमंत्र्यासह मंत्री, आमदार गुवाहाटीला रवाना | पुढारी

कामाख्या देवीच्या आशीर्वादाने जनतेच्या मनातलं सरकार आलं, मुख्यमंत्र्यासह मंत्री, आमदार गुवाहाटीला रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट आज गुवाहाटीला पुन्हा एकदा रवाना झाला. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना गुवाहाटी दौऱ्याचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ‘आमचा दुसरा काही अजेंडा नाही. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं आहे. जनतेच्या सुख-समृद्धीसाठी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी चाललो आहोत.’

शिंदे म्हणाले की ‘जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आम्ही चाललो आहोत. कामाख्या देवी ही इच्छा पूर्ण करणारी देवी आहे. कामाख्या देवीनं इच्छा पूर्ण केली. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं. देवीवर संपूर्ण श्रद्धा आहे. आता पुन्हा जनतेच्या सुख समृद्धीसाठी चाललो आहोत.’

आम्ही राज्यातील जनता सुखी राहावी, यासाठी हे करत आहोत. राज्यातल्या बळिराजाला चांगले दिवस येऊ देत. राज्यावर आलेली संकट अनिष्ट दूर होऊ देत यासाठी आमचा प्रयत्न असतो. तिकडे जाण्याचा आमचा कोणताही अजेंडा नाही. राज्यातील संकटं टळू देत यासाठी आम्ही देवीकडे प्रार्थना करणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button