पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यात आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. आज राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी कडू यांच्यावर केलेल्या विधानाबाबत दिलगिरीही व्यक्त केली. यानंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडु म्हणाले, "माझ्यासाठी माझे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार.". (Kadu Vs Rana)
गेले काही दिवस आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केले होते की, त्यांनी सत्तेत येण्यासाठी पैसे घेतले आहेत. या आरोपानंतर हा वाद वाढतचं गेला. राणा यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे, त्यांनी माझी माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जावे. अखेर हा वाद शिंदे-फडणवीस यांच्याकडे गेला. चर्चेअंती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
हा वाद व्हायला नकोे होता. हा वाद मी केला नव्हता. जे काही बोलले ते राणा बोलले आहेत. त्यांची काय भूमिका आहे असे विचारले असता ते म्हणाले, माझ्यासाठी माझे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. त्यानंतर मी उद्या माझी भूमिका स्पष्ट करेन.
या वादावर आज सकाळी माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले होते की, "मी माझे शब्द मागे घेतो, हा वाद माझ्याकडून संपवला आहे. माझ्याकडून कोणी दुखवल असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमदार बच्चू कडूदेखील त्यांचे शब्द मागे घेतील."
हेही वाचा