राणा-कडू वाद : बच्चू कडू यांच्याबद्दल वापरलेले शब्द मागे घेतो : रवी राणांनी व्यक्त केली दिलगिरी
पुढारी ऑनलाईन डेस्क : बच्चू कडू आणि मी नवीन सरकारचे घटक आहोत, त्यांच्याबद्दल वापरलेले शब्द मी मागे घेतो, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. बच्चू कडू हेही त्यांनी वापरलेले आक्षेपार्ह शब्द मागे घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
च्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. याप्रकरणी रवी राणांविरोधात बच्चू कडू यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रवी राणा यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे, आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, असे आव्हान आमदार कडू यांनी दिले होते.
कडू आणि राणा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला.आज फडणवीस यांनीही दोघांमधील वाद मिटविण्यासाठी राणा यांना भेटण्यासाठी बोलावले होते. या भेटीनंतर राणा यांनी बच्चू कडूंबद्दल केलेले वक्तव्य मागे घेतले. देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. त्यांनी दिलेले आदेश माझ्यासाठी सर्वस्वी असतात. माझ्याकडून कोणी आमदार किंवा मंत्री दुखावले गेले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. बच्चू कडूं यांच्याबद्दल केलेले आरोप मागे घेतो. कडू यांनीही आक्षेपार्ह केलेली वक्तव्य मागे घ्यावीत, असे आवाहनही यावेळी राणा यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :