पुणे : उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा आज केवळ 15 टक्के आहे. सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी न झाल्यास धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मर्यादा येतील. त्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पुढील वर्षाच्या सिंचनावर होणार आहे. सध्याचा पाणीसाठा केवळ पिण्यासाठी पुरेल इतकाच आहे. सोलापूर जिल्ह्यात 43 साखर कारखाने असून, त्यांच्यातील बहुतेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून आहे.
पुणे जिल्ह्यातील चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातही धरणाच्या जलाशयातून पाणी घेतले जाते. उजनी धरणातून सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरविले जाते. गेल्या वर्षी उजनी भरल्यामुळे सुमारे 60.57 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शेतीच्या तिन्ही हंगामातील सिंचनासाठी पुरविण्यात आले. आज धरणातून उपयुक्त पाणीसाठा केवळ आठ टीएमसी आहे.
नऊ धरणांतून पाणी उजनी जलाशयाकडे येते. यंदा ऑगस्ट संपला असतानाही खडकवासला प्रकल्प भरलेला नाही. अन्य चार धरणे भरली असली, तरी त्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस नाही. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस कुकडी खोर्यात पडतो. मात्र, तेथील धरणातील पाणीसाठा 68 टक्के आहे. त्यामुळे धरणे भरल्याशिवाय त्यातून पाणी उजनीसाठी सोडता येणार नाही.
उजनीत या धरणांतून येते पाणी
धरण उपयुक्त साठा (टीएमसी) टक्केवारी विसर्ग (क्यूसेक)
खडकवासला
प्रकल्प 27.54 94.48 00
मुळशी 19.87 98.58 00
पवना 8.51 100 1202
चासकमान 7.58 100 300
भामा आसखेड 6.77 88.32 00
वडिवळे 1.07 100 00
आंद्रा 2.85 97.38 25
कासारसाई 0.57 100 1202
घोड 1.14 23.40 00
हेही वाचा