पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलाने २८ आणि २९ जानेवारी रोजी अरबी समुद्रात चाच्यांचे दोन मोठे अपहरणाचे प्रयत्न अवघ्या २४ तासांत हाणून पाडले आहेत. भारतीय नौदल युद्धनौका आयएनएस सुमित्रा यांनी रविवारी इराणी जहाज एफव्ही इमानला वाचवल्यानंतर दुसऱ्या एका कारवाईत अल नैमी या जहाजाची आणि क्रू (१९ पाकिस्तानी नागरिक) ची सोमालियन चाच्यांच्या तावडीतून सुटका केली. या कारवाईत भारतीय सागरी कमांडोनेही भाग घेतल्याचे वृत्त आहे.
भारतीय नौदल जहाज सुमित्रा, एफव्ही इमानवरील चाचेगिरीचा प्रयत्न उधळून लावत, सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी एक यशस्वी चाचेगिरी विरोधी ऑपरेशन पार पाडले. ११ सोमाली समुद्री चाच्यांपासून मासेमारी जहाज अल नईमी आणि तिच्या क्रू ची सुटका केल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, २९ जानेवारीला अल-नईमी जहाजाला वाचविण्यासाठी ऑपरेशन राबवले. यामध्ये सर्व १९ क्रू मेंबर पाकिस्तानी नागरिक आहेत. मरीन कमांडोजनी जहाजाला वेढा घातल्यानंतर जहाजातून दरोडेखोरांनी पलायन केले.
हेही वाचा :