पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.९८ टक्के इतके आहे. २०२३ च्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत थोडीशी वाढ झाली आहे. यंदाच्या बारावी निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.५२ टक्के आहे. तर मुलांचे प्रमाण ८५.१२ टक्के एवढे आहे. याचाच अर्थ मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ६.४० टक्के अधिक आहे.
बारावी बोर्ड (CBSE Result 2024) परीक्षेत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सुमारे २४ हजार विद्यार्थ्यांना सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि सुमारे १.१६ लाख विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक आहे. CBSE ने १५ फेब्रुवारी आणि २ एप्रिल दरम्यान इयत्ता १२वी परीक्षा घेतली होती.
हे ही वाचा :