अमृतसर : पुढारी ऑनलाईन
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. डावाने पराभूत होण्याची नामुष्की श्रीलंका संघावर ओढावली. या सामन्यात टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ( Ashwin ) कपिलदेवचा विक्रम मोडला. तो आता कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेच्या चरिथ असलंकाराची विकेट घेत कपिलदेवचा विक्रम मोडला असून आता त्याच्या नावावर ४३५ विकेट झाल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळी घेत अनिल कुंबळे हा कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. तर कपिलदेवने १३१ कसोटी सामन्या ४३४ बळी घेतले होते. कपिलदेवने एकाच डावात ५ विकेट घेण्याचा पराक्रम २३ वेळा तर दोनवेळा १० विकेट घेतल्या आहेत. कपिल देवचा विक्रम अश्विनने केवळ ८५ कसोटी सामन्यात मोडला आहे.
हेही वाचलं का?