Marathwada Cabinet meeting : मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी सरकार प्रयत्नशील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठवाड्यातील लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी सरकारचा प्रयत्न असून मराठवाड्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देऊ. मराठवाड्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. भविष्यात या परिसराला आध्यात्मिक आणि वैज्ञानिकही महत्व येईल. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक निर्णय होतील, असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दुष्काळसद़ृश परिस्थिती, अनुशेष आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तत्पुर्वी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Marathwada Cabinet meeting)
संबंधित बातम्या :
- Chhatrapati Sambhaji Nagar | संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, राजपत्र जारी
- अख्खे मंत्रिमंडळ आज छत्रपती संभाजीनगरात
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यातील जनतेला मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या (Marathwada Mukti Sangram) शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मराठवाडा संतांची भूमी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील पायाभूत सुविधांना सरकारने प्राधान्य दिले आहे. आपले सरकार स्थापन व्हायच्या आधी अडिच वर्ष कामं ठप्प होती, आपलं सरकार येताच उपक्रमांना चालना दिली. संभाजीनगरला यापुर्वी २ हजार ७७४ कोटींची पाणी योजना दिली. ५०० कोटी रस्त्यांना दिले. शहरातील मुलभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. चांगल्या दर्जाची काम करून घेण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र उद्योग धंद्यात मागे पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा प्रभाविपणे सुरू केला आहे. मराठावाड्यातील लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी सरकारचा प्रयत्न असेल. येथील बांधवांनी स्वातंत्र्यासाठी दिर्घ लढा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांचे दिल्लीत स्मारक असावं अशी भावना व्यक्त केली, यासाठी देखील प्रयत्न करू, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
#WATCH | Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra: While inaugurating various development programs, Maharashtra CM Eknath Shinde says, “The whole world came for G20 and the miracle to bring all these people in India was done by PM Modi…Our country has become the fifth-largest… pic.twitter.com/RLUGzMsZq5
— ANI (@ANI) September 16, 2023
मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारी बैठक (Marathwada Cabinet meeting)
“मंत्रीमंडळाचे निर्णय मराठवाड्याला चांगले काही देतील, मराठवाड्याच्या विकासासाठी राहिलेली कामे आणि नव्याने करावयाच्या कामांना चालणा देणारी बैठक ठरेल,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. गुजरातकडे जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन सुरू आहे, असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील ३०० वर्ष जून्या पुलांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरीक सिटीचा कंत्राटी पद्धतीने जी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
पॅकेज मिळाल्यानंतर त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी लक्ष दिले पाहिजे. आढावा घेतला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला. शहरासाठी ज्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे, ते वेळेत का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर असे जिल्ह्याचे नाव केले आहे, त्यामुळे या नावाला साजेश्या शासकीय इमारती बांधल्या पाहिजेत, असेही पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :