या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग : नितेश राणे

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली. राणे यांच्या विधानाविराेधात राज्यभर पडसाद उमटले. ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, युवा सेनेने मुंबईतील नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. या युवा सैनिकांचा मातोश्री वर सत्कार केला. यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
- नारायण राणे यांची अटक की, सेना-भाजप संभाव्य युतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’?
- उद्धव ठाकरे : ‘नवा आहे पण छावा आहे!’, नारायण राणे यांच्यावर पलटवार
नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या युवा सैनिकांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर सत्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोवर नितेश राणे यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
पश्चिम बंगाल प्रमाणेच ही राज्य पुरस्कृत हिंसा होती! राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सुरक्षा सुनिश्चित करत आहेत; पण ते खरंच गुंडांचा सत्कार करत आहेत!
महाराष्ट्रातील परिस्थिती !! या ठगांपासून वाचायच असेल तर एकमेव मार्ग म्हणजे राष्ट्रपती राजवट! अस ट्विटमध्ये आमदार नितेश राणे यांनी म्हटल’ आहे.
So it was indeed a state sponsored violence just like West Bengal !
As a head of the state the CM shud be ensuring safety but he is actually felicitating hooligans!
State of affairs in Maharshtra!!
Presidents rule is the only way out to ensure safety from these thugs! pic.twitter.com/UH5RieArLo— nitesh rane (@NiteshNRane) August 25, 2021
हे ही वाचलं का?
- केतकी माटेगावकर हिच्या नव्या गाण्याची पडेल भुरळ
- राणेंना उचलण्याचा आदेश अनिल परब यांनी दिला? व्हिडिओ व्हायरल!
- कोकणातील जनआशीर्वाद यात्रा स्थगित; दरेकर कोकणात दाखल