

मीरपूर; वृत्तसंस्था : या विजयाने त्यांनी आपली लाज राखली आहे. टीम इंडियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या ताब्यात घेतली होती. टीम इंडियाने तिसरा सामनाही जिंकला असता, तर बांगला देशला घरच्या मैदानावर क्लीन स्वीप स्वीकारावा लागला असता. मात्र शमिमा सुलतानची उत्कृष्ट फलंदाजी आणि रुबिया खानच्या गोलंदाजीच्या जोरावर बांगला देशने तिसरा टी-20 सामना जिंकला. (IND vs WI)
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना भारताने 20 षटकांत 9 विकेटस् गमावून 102 धावा केल्या. टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने 41 चेंडूंत 40 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. तिच्याशिवाय जेमिमाने 28 धावांचे योगदान दिले. या दोन खेळाडूंशिवाय एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. (IND vs WI)
बांगला देश संघाने सर्वप्रथम नेत्रदीपक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यानंतर सुरेख फलंदाजी करताना 19.2 षटकांत 6 विकेटस् गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. बांगला देशकडून शमिमा सुलतानने 46 चेंडूंत 42 धावांची शानदार खेळी केली. ती सलामीवीर म्हणून मैदानात उतरली होती. तिच्याशिवाय कर्णधार निगार सुलतानने 14 आणि सुलताना खातूनने 12 धावांचे योगदान दिले.
पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 7 विकेटस्ने विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात भारताच्या विजयाची हीरो ठरली, तिने 54 धावांची शानदार खेळी केली. दुसर्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून दीप्ती शर्माने चांगली कामगिरी केली. तिने 10 धावा केल्या आणि 4 षटकांत 12 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेटस् घेतल्या होत्या.
बांगला देशने तिसर्या टी-20 सामन्यामध्ये शानदार पुनरागमन केले आणि 4 गडी राखून शानदार विजय नोंदवला. या विजयात रुबिया खान आणि शमिमा सुलताना या विजयाच्या नायक होत्या. रुबियाने 4 षटकांत 16 धावा देत 3 बळी घेतले. त्याचबरोबर शमिमाने 42 धावांची खेळी केली.
हेही वाचा;