Uncategorized

औरंगाबाद : नाथसागर धरणाचे सर्व दरवाजे बंद

दिनेश चोरगे

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीत धरणातून सुरू असलेला विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी दुपारी १.३० च्या दरम्यान धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले.

२५ जुलै रोजी नाशिकसह छोट्या मोठ्या प्रकल्पातून धरणामध्ये येणारी पाण्याची आवक वाढ झाल्याने येथील नाथसागर धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले.  ८ दरवाजातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, पाऊस थांबल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी धरणाचे उघडलेले सर्व दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून काही प्रमाणावर गोदावरी नदीत विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. धरणाच्या पाण्याची टक्केवारी ९० टक्के कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT