Uncategorized

औरंगाबाद : किरकोळ भांडणातून हनुमान नगरात तरुणाचा खून

अनुराधा कोरवी

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणातून रेकॉर्डवरील आरोपीने एका तरुणाचा खून झाला.  ही घटना औरंगाबाद येथील हनुमान नगरातील गल्ली क्र. २ मध्ये सोमवारी (दि.९) रोजी सकाळी घडली.आकाश राजपूत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश तनपुरे याने हा खून केला असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पाेलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी आकाश आणि रेकॉर्डवरील आरोपी गणेश तनपुरे यांच्यात किरकोळ भांडण झाले . याच राग मनात धरून आरोपी गणेश याने आज सकाळी आकाशचा खून केला.

या प्रकरणी पुंडलीक नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आदींनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचलंत का? 

पाहा : कोकणी खेकडा फ्राय रेसिपी माहीत आहे का?

SCROLL FOR NEXT