Konkan Coastal Erosion Pudhari
ठाणे

Konkan Coastal Erosion: कोकण किनारपट्टी धोक्यात; समुद्रपातळी वाढीने वाढले संकटाचे सावट

720 किमी किनाऱ्यावर धूप तीव्र; ग्लोबल वॉर्मिंग, वाळू उपसा आणि खारफुटी नाशामुळे हजारो वस्ती धोक्याच्या कक्षेत

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कोकणला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. मात्र, या किनारपट्टीची होणारी धूप आणि हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचे संकट अलीकडच्या दहा वर्षात अधिक वाढले आहे. रायगड जिल्ह्यात शहापूर धेरंडपासून श्रीवर्धनपर्यंत अनेक ठिकाणी ही समस्या जशी जाणवते तशीच रत्नागिरी सिंधुदुर्गातही अनेक किनाऱ्यांवर समुद्र उधाणाचा फटका बसत आहे. किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर वाळू बाहेर काढली जात असल्याने हे प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला खाडी किनाऱ्यांनी खारफुटीची जंगले नष्ट करून शहरांमध्ये इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असल्याने समुद्राचे पाणी एकीकडून दुसरीकडे या नियमाप्रमाणे याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा परीणामही यामध्ये असल्याचे संशोधकांचे मत आहे. परंतु यावर उपाय काय, हा प्रश्न अधांतरीच आहे.

शासनाने किनारी भागाची धूप रोखण्यासाठी कोस्टल सेंटीमेटल सेल सुरू करण्याची भूमिका घेतली. यासाठी कांदळवन संवर्धन हाही एक महत्वाचा विषय होता. कांदळवन संवर्धन करून समुद्रांच्या लाटांपासून त्या भागांचे संरक्षण करता येते, हे पूर्वांपार आपण पाहत आलो आहोत. कांदळवनांमुळे मत्स्य बीज संरक्षण होते. दुसऱ्या बाजूला लाटा कांदळवनात जोरदार आदळल्या तरी त्याचा पुढे येण्याचा वेग कमी होतो. हा मुद्दा लक्षात घेऊ न कोकणात कांदळवने संरक्षण मोहिमेला गती देण्यात आली. परंतु समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचा मुद्दा हा जागतिक पातळीवरच आहे. परंतु त्याचा अधिक परिणाम कोकण किनारपट्टीवर अधिक दिसू लागला आहे. कोकणात जवळपास दीड हजार वस्त्या या समुद्र उधाणाच्या कक्षेत आहेत. त्यांचे संरक्षण कसे करता येईल, यावर तेवढ्या गांभीर्याने विचार झालेला नाही. परिणामी घोंगावणारे हे संकट वर्षागणिक तीव्र होताना दिसत आहे.

कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्राच्या येणाऱ्या लाटा साडेचार ते पाच मीटर उंचीच्या असतात. त्यामुळे अनेकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असतो. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्याचे निरीक्षण भरती मापकांच्या अहवालातून अनेकदा पुढे आले आहे. 1987 ते 2024 पर्यंत समुद्राच्या पातळीत 4.44 सेंटी मीटरने वाढ झाल्याचे सांगितले गेले. मुंबई क्लायमेटच्या अभ्यासानुसार मुंबई, कोकणसह 11 भारतीय किनारे पुढील तीन दशकांत काही प्रमाणात अडचणीत येतील. कारण, याच भागामध्ये 1 ते 3 मीटरने समुद्राच्या पाण्याची उंची वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे हा भाग पाण्याखाली जाईल का, अशी शंका

निर्माण झाली आहे. यासाठी किनारी भागात होणारा वाळूचा उपसा थांबवणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. आर्थिक आणि रिअल इस्टेटच्या जमान्यात वाढते हाउसिंग प्रकल्प आणि अनेक विकास प्रकल्पांसाठी तिसरी मुंबई, चौथ्या मुंबईच्या कार्यक्षेत्रात होणारे मोठे उत्खनन निर्माण होणारी चक्रीवादळे अशा अनेक कारणांमुळे किनारी भाग संकटात आहे. मुंबई भोवतीच्या समुद्राची पातळी भविष्यात 20 सेंटीमीटरने वाढेल, असा अंदाज आहे. वसई-विरार शहर तर खोलगट भागात असल्याने या भागावरही संकट गहिरे आहे. यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. किनारपट्टीची धूप थांबविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. कांदळवनांचे बचाव आणि संवर्धन या गोष्टींवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळण्याची गती वाढत आहे आणि महासागरांचा विस्तार होत आहे. ज्यामुळे समुद्राच्या पातळीत सतत वाढ होत आहे. ही घटना विशेषतः मुंबईसाठी चिंताजनक आहे, कारण हे शहर पुनर्संचयित बेटांवर वसलेले आणि अरबी समुद्राने वेढलेले एक सखल किनारी महानगर आहे. वैज्ञानिक मूल्यांकन आणि सरकारी अहवालांवरून असे दिसून आले आहे की शहराभोवती समुद्राची पातळी आधीच लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि येत्या काही दशकांमध्ये ती वाढतच राहील. हे बदल, अधिक तीव्र वादळे आणि मुसळधार पावसासह, मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि वस्तीला धोका निर्माण करतात.

समुद्राच्या पातळीत वाढ

भरती-मापकांच्या निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे की 1987 ते 2021 दरम्यान मुंबईभोवती समुद्राच्या पातळीत 4.44 सेमीने वाढ झाली , जी पंधरा भारतीय किनारी शहरांमध्ये सर्वात मोठी वाढ आहे . षेीपींळशीीळप.ेीस . सरासरी, शहरात वार्षिक 3.15 मिमी वाढ होत आहे. मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनने जाहीर केलेल्या आणखी एका अभ्यास अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, मुंबई आणि इतर 11 भारतीय किनारी शहरांमध्ये पुढील तीन दशकांत समुद्राच्या पातळीत 0.1 मीटर ते 0.3 मीटर दरम्यान वाढ होईल.

भूस्खलन आणि अतिरेकी घटना

वाढत्या समुद्रापलीकडे, भू-पुनर्प्राप्ती आणि मोठ्या प्रमाणात बांधकामांमुळे मुंबई दरवर्षी सुमारे 2 मिमीने बुडत आहे. ेीिपींळशीीळप.ेीस पासून, हवामान बदलाशी संबंधित अतिरेकी हवामान घटनेने शहराला तडे न जाता एकही वर्ष गेले नाही . जेव्हा समुद्राच्या पातळीत वाढ आणि तीव्र पाऊस आणि वादळ लाटा येतात, तेव्हा त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते ज्यामुळे शहराचा मोठा धोक पोहोचू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT