नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जवळील वाडीवऱ्हे जवळ ट्रक आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर जण जखमी झाले आहेत.
अधिक वाचा
मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर नाशिककडून येणारा ट्रक डिव्हाईडर तोडून जोरदार धडकला. अचानक झालेल्या ह्या अपघातात चारचाकी वाहनातील ३ जण जागीच ठार झाले. तर आणखी २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. २१) सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली.
रिजवान इकबाल कुरेशी ( वय ३० ), जुबेर इकबाल शेख ( वय ३० ), हुजेफ एजाज उस्माणी ( वय २१ ), सोहेल अकिल पठाण ( वय २२ ) अशी अपघातात मयत झालेल्यांनी नावे आहे. ही तरुण मुले ऐन ईदच्या सनादिवशीच काळाने हिरावून घेतल्याने कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
अधिक वाचा
जखमी असलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या किमान ५ फेऱ्या झाल्या असून आणखी जखमी व्यक्ती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा
अपघातात जागीच ठार झालेले ३ जण आणि जखमी व्यक्ती नाशिक शहरातील असल्याचे समजते. मयत व जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू आहे. पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असून दोन्ही रस्त्यांच्या बाजूला बघ्यांची गर्दी वाढली आहे.
हे ही वाचले का?
पाहा फोटो : मिस इंडिया युएस वैदेही डोंगरे
[visual_portfolio id="11203"]