Latest

ShivSena: मोठी बातमी! आमदार आमच्या संपर्कात; पुन्हा सत्तापरिवर्तन होणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक आमदार-खासदार मानसिकरित्या सध्याच्या सरकार सोबत नाहीत. ते संभ्रमावस्थेत आहेत. आज गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे मोठे विधान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री सतत दिल्ली वाऱ्या करत आहेत. आत्तापर्यंत ते पाचवेळा दिल्लीला जाऊन आले. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांवर वारंवार दिल्लीवर जाण्याची वेळ नाही आली. सध्याच्या मुख्यमंत्र्यांना आपला मुक्काम दिल्लीलाच हलवावा लागतोय का? असा प्रश्न संध्या निर्माण झाल्याचे म्हणत, शिंदेंच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवारीवर संजय राऊतांनी टिकास्त्र सोडले आहे.

सध्या ईडीकडून अनेकांच्या चौकशा होत आहेत. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी,  राष्ट्रवादीचे नवाब मलिक  यांना देखील ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही सर्वांनी चौकशीला हजर रहात, ईडीचा मान राखला आहे. याप्रकरणात मला अटक जरी झाली. तरी  मी शिवसेनेकडून अटकेची कारवाई स्विकारेन असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पक्षप्रमुख असा उल्लेख न करणे हा कुदरपणा आहे. असा उल्लेख करणारे हे संकुचित वृत्तीचे आहेत. त्यामुळे यापुढे देखील उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT