मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'हंगामा' या हिट चित्रपटाने ओळख निर्माण केलेली अभिनेत्री रिमी सेन (Rimi Sen) हिचा आज वाढदिवस. रिमी सेन हिने आपल्या कारकिर्दीत ॲक्शन चित्रपटांसोबत काही विनोदी चित्रपटदेखील हिट केले आहेत. तिने 'हंगामा' सोबत 'बागबान' आणि 'धूम' या चित्रपटांमधील तिच्या भूमिका चाहत्यांना आजही स्मरणात आहेत. एवढेच नाही तर, ती अभिनयसोबत राजकारणात उतरली होती. पंरतु, रिमीचे वय चाळीशीत असूनही तिने अद्याप लग्न केलेले नाही . जाणून घेवूयात तिच्या करिअरविषयी…
चित्रपटांत येण्यापूर्वी रिमी जाहिरात आणि मॉडेलिंग करत होती. याच दरम्यान ती कोकच्या ऑडिशनला गेली होती आणि तेथेच तिची ओळख चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन याच्यांशी झाली. यावेळी ते हंगामा चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. यानंतर त्यांनी तिच्या समोर प्रस्ताव ठेवला आणि एकही क्षण न घालवता रिमीने तो स्वीकारला.
चित्रपटात काम करण्याची ऑफर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्वतः तिला दिली होती त्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास फारसा संघर्ष करावा लागला नाही.
हंगामा हिट झाल्यावर तिला या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटानंतर रिमीकडे अनेक चित्रपटांची ऑफर येवू लागली. हंगामा चित्रपटाने रिमीला वेगळी ओळख मिळवून दिली. यानंतर तिने 'बागबान', 'धूम', गोलमाल'आणि 'दिवाने हुआ पागल' यासारखे चित्रपट साईन केले ते देखील चित्रपट हिट झाले.
या चित्रपटातील अभिनयाने रिमीचे करिअर उंचावर पोहोचले. रिमीने बॉलिवूडसोबत बंगाली आणि तेलगू चित्रपटात काम केले. याशिवाय ती 'गरम मसाला', सलमान खानचा 'क्यूंकी' आणि 'फिर हेरा फेरी' या चित्रपटात झळकली. यानंतर शेवटीची ती 'बिग बॉस'शोमध्ये दिसली. या शोनंतर तिच्या करिअरला ब्रेक लागला.
यानंतर तिने २०१७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. पंरतु, ती फार काळ राजकारणात सक्रिय राहिली नाही. तिने एका मुलाखतीत चित्रपटांमध्ये काम करून खूपच कंटाळले असून मला दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये जायचे असल्याचे म्हटले होते.
रिमीने चित्रपटातून ब्रेक घेतला असून ती सोशल मीडियात सक्रिय आहे. एकेकाळी आपल्या चित्रपटांमुळे हिट झालेली अभिनेत्री रिमीने अद्याप लग्न केलेले नाही. सध्या ती चाळशीत पोहोचली आहे. याशिवाय तिच्या अफेअरचे देखील कुठलीही चर्चा झालेली नाही. या सर्वावरून ती सर्वसामान्यांसारखे राहत असल्याचे दिसले आहे.
रिमीचा जन्म २१ सप्टेंबर १९८१ रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. तिने आपले प्राथमिक शिक्षण कोलकाताच्या विद्याभारती गर्ल्स हायस्कूल तर कलकत्ता विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केली आहे.
हेही वाचलंत का?