प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण काल बुधवारी (दि.09) तब्बल १५०० पोलिसांच्या बंदोबस्तात हटवण्यात आले आहे . शिंदे – फडणवीस सरकारने केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकने परिसरात खळबळ उडाली. परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानाची कबर आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही गोष्टींचे अतिक्रमण वाढले होते. यातून अनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता. कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते. याच कारणामुळे सातारा पोलिसांनी इतर चार जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरापासूनच हा बंदोबस्त आल्यानंतर पहाटे चोख बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आले.