

मोरबीचे विद्यमान भाजप आमदार बृजेश यांचे तिकिट पक्षाने कापले आहे. त्यांच्या जागी माजी आमदार कांतिलाल अमृतिया निवडणूक लढवतील. मोरबी पूल दुर्घटनेत कांतिलाल यांनी लोकांचे जीव वाचवण्यासाठी मच्छू नदीत उडी घेतली होती. विशेष म्हणजे किक्रेटर रवींद्र जडेजा यांची पत्नी रीवाबा यांना जामनगर (उत्तर) मधून भाजपने उमेदवारी दिली आहे.
तिकिट वाटपासंबंधी चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बुधवारी बैठक पार पडली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह उपस्थित होते. बैठकीत १८२ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने ३८ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे, तर ६९ आमदारांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे.