नारायणगावनजीक अपघात; पुण्यातील ५ जण गंभीर जखमी

नारायणगावनजीक अपघात; पुण्यातील ५ जण गंभीर जखमी
Published on
Updated on

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर आज (दि. ८) पहाटे नारायणगावजवळ पुण्याच्या दिशेला निघालेली मारुती वॅगन आर गाडी पोटचारीवरील पुलाच्या कठड्याला धडकून खाली पडली. पाच जण गंभीररित्या जखमी झाले असून, त्‍यांच्‍यावर नारायणगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळी धुके असल्याने गाडी चालकाला पुलाचा कठडा दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रोहन लहाडे, विशाल उबाळे, प्रतिक जाधव, राजकुमार जयस्वाल, गोकुळ जाधव, (वय २० ते २३ वर्ष, रा. वाकड पुणे) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण संगमनेरहून पुण्याच्या दिशेला निघाले होते. नारायणगाव ओलांडून पुढे पुण्याच्या दिशेला जाताना हॉटेल राजवैभव जवळ असणाऱ्या पोट चारीच्या पुलाला धडकून वॅगन आर (एमएच १४ जेई १२९) गाडी पुलाखाली काेसळली. कारच्‍या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात पाच जणांना गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news