हमीभावाची पोकळ घोषणा करतात, हमाभावाने कुठे खरेदी सुरु आहे, सोयाबीन, कापसाचे दर पडलेले आहेत. धान पीक निघायला सुरवात झाली असल्याने सातशे रुपये बोनसची मागणी करतो आहे, सरकारकडून अद्याप पूर्तता झाली नाही. सरकारने लवकरात लवकर बोनस द्यावे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यानंतर घोषणा सरकार करणार आहे का? राजू शेट्टी यांची तीच मागणी आहे. आजच्या चर्चेनंतर आम्ही त्या संदर्भात बोलू असे स्पष्ट केले.