चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात तोरगाव येथे गुरूवारी (3जून) सायंकाळी पाच वाजता वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. सुरेश नारायण रामटेके (वय ५५) व अश्विनी कमलेश मेश्राम (वय १६, दोघे रा.तोरगाव) अशी मृतांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी सुरेश नारायण रामटेके (वय ५५) रा.तोरगाव व अश्विनी कमलेश मेश्राम (वय १६) हे नेहमी प्रमाणे गावालगत बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. अचानक सायंकाळी पाच वाजता दरम्यान वादळी वारा आणि विजेचा कडकडाटाने पाऊस आला. यावेळी सुरेश व अश्विनी यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.