पंढरपूर : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात रोज कोट्यवधी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. याच विठ्ठल मंदिरामध्ये मोबाईल बंदीचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. हा निर्णय १ जानेवारीपासून लागू होणार आहे.
महाराष्ट्रातून रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हे भक्त मंदिरात विठुरायाचा फोटो काढतात म्हणूनच मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. या अगोदरही मंदिर प्रशासनाने सुरक्षेसाठी मोबाईल बंदी केली होती. यावेळी वारकऱ्यांनी व भाविकांनी मंदिर प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता.