नाना पटोले म्हणतात ‘आमचं ठरलंय’; आम्ही महाविकास आघाडीत नाही

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आगामी निवडणुकांना अवधी असला तरी त्याची तयारी मात्र जोरात सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे विधान करत असून राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी सेनेसोबत लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही 'आमचं ठरलंय' असे सांगत आम्ही स्वबळावर लढणार असे सांगितले आहे. 

वाचा : धोकादायक इमारत कोसळणे ही मानवनिर्मित आपत्ती : हायकोर्ट

शरद पवार यांनी भाषणात सेना आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगाने वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यात भविष्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र दिसतील की नाही? अशी शंका उपस्थित केली जात आहे. सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात नाना पटोले म्हणाले, 'आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दल आमचे धोरण जाहीर केले आहे. समजा आम्ही सोबत आहोत असे म्हटले आणि ऐन निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल. त्यामुळे आम्ही आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे.' 

वाचा : किंगमेकर प्रशांत किशोर शरद पवारांना का भेटले?

आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. तुम्हीही तयार करा, असे सांगत पटोले यांनी रणनीती स्पष्ट केली.  शरद पवार यांच्या भाषणानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी 'पवार जे बोलतात त्याच्या उलटा अर्थ घ्यायचा असतो.' असे सांगून सेनेवर टीका केली होती. तर आमदार राम कदम यांनीही पवारांवर टीका केली होती. 

वाचा : चेल्लम सरांनी दिली मुंबई पोलिसांना टीप

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news