जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी शनिवार (दि. १६) आणि रविवार (दि.१७ ) रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी येत्या शनिवार-रविवारच्या आधीच करून घ्यावी. तसेच शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी साठवून ठेवावा, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.
या कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : आपत्ती आणि सरकारी अनास्थेच्या 'डोंगरा'खाली दबलेलं ढोकावळे