

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : thane illegal construction : अनधिकृत बांधकामांववरील कारवाई थांबवण्यासाठी मला केंद्रीय मंत्र्यांकडून फोन आले, अशी खळबळजनक माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत दिली आहे.
हे फोन कोणत्या मंत्र्यांचे त्या मंत्र्यांचे नाव सांगणार नाही, मात्र अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी कोणाचेही फोन आले तरी अशा बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे. महापौरांच्या या माहिती नंतर ठाण्याचे राजकारण मात्र चांगलेच तापले असून यावरून भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.
शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सध्या चांगलाच तापला आहे. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा अनधिकृत बांधकामांवर (thane illegal construction) केलेल्या कारवाईमुळेच झाला या वक्तव्यावरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिक चिघळला आहे. सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला आहे तसेच बांधकामे तोडण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत या आदेशाची प्रत मिळावी अशी मागणी त्यांनी प्रशोत्तरराच्या तासात सभागृहात केली.
मात्र महापौर नरेश म्हस्के यांनी कृष्णा पाटील यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत पालकमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री यांनी प्रशासनासोबत काय पत्रव्यवहार केला हे सांगणे बांधकारक नाही, तसेच प्रश्न घायचा की नाही हा अधिकार महापौरांचा असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री हे सभागृहाचा भाग नसल्याचे सांगत त्या प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे असे त्यांनी सभागृहात सांगितले.
सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्यांनंतर तसेच कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांवर (thane illegal construction) मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात करण्यात आली.
मात्र कृष्णा पाटील यांनी घेत पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री यांच्या पत्रव्यवहारासंदर्भातच प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी थेट अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचेच फोन आले असल्याची खळबळजनक माहिती यावेळी दिली.
मात्र कोणत्या मंत्र्यांचे फोन आले हे नाव त्यांनी सभागृहात जाहीर केले नाही.
आमदार केळकर आंणि डावखरे यांचे नाव का नाही ?
भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला याची माहिती मागितली. यावर महापौरांनी आक्षेप घेत अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी देखील पत्रव्यवहार केला . मात्र त्यांचे नाव का घेण्यात आले नाही, असा प्रश्न महापौर नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप महापौरांनी यावेळी केला.
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="38048"]