

पुढारी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा पोलिस प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. ३० जूनपर्यंत ठाणे शहरात कलम 144 CrPC लागू करण्यात आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि राज्यातील काही आमदारांनी पक्षाविरूद्ध बंडखोरी केली. पक्षप्रमुखांवर नाराज होत या बंडखोर नेत्यांनी आपला एक वेगळा गट तयार केल्याने, राज्यातील तळागाळाच्या शिवसैनिकांचा राग अनावर झाल्याने ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहेत.
राज्यातील राजकीय घडामोडी आणि शिवसेनेतील बंडखोरी च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी 30 जून पर्यंत जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. ठाणे शहरात शिवसैनिक हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे असले तरी, मुंबईतील शिवसैनिकांचा वाढता रोष पाहता ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकक्षेतील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.
या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्त ठाणे पोलिसांकडून ३० जूनपर्यंत ठाणे शहरात कलम 144 CrPC लागू करण्यात आले आहे. येथील ठाणे पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात ३० जूनपर्यंत कोणत्याही प्रकारे राजकीय प्रक्रिया, मेळावे किंवा एकत्रित येत, घोषणाबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठया-काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे. व्यक्तिचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, यामुळे सभ्य नितीला धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे, तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किवा लोकांत प्रचार करणे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
हेही वाचा :