स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा स्वतंत्र लढणार 

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा स्वतंत्र लढणार 
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा लोकसभा मतदार संघामध्ये स्वाभिमानीने लक्ष्य केंद्रीत केले आहे. तर ४२ मतदार संघांमध्ये चळवळीत काम करणाऱ्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज (दि.५) स्पष्ट केले. जनतेचा जो आक्रोश आहे तो पुढे आणायचा असेल तर सर्वांच्यापासून अलिप्त राहून स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

सरकारने थकीत अनुदानाबाबत निर्णय घ्यावा

गेल्या ७  वर्षापासून राज्यातील ऊस तोडणी मशीन घेतलेल्या शेतक-यांनी सरकारकडून अनुदान मिळणार या आशेने कोट्याRaju Shettiवधी रूपयाची कर्जे काढून यंत्र खरेदी केलेली आहेत. राज्यातील ऊस तोडणी यंत्र मालकांच्या प्रलंबित अनुदानाबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षात असणारे राज्यकर्ते यांच्या धोरणांमुळेच राज्यातील ९०० हून अधिक मशीनधारकांचा बळी जात आहे. यामुळे सरकारने तातडीने ३८७ कोटी रूपयाच्या थकीत अनुदानाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील वर्षीचा गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुंबई आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन मांडले.
राज्यामध्ये ऊस तोडणी मजूरांची कमतरता पडू लागली आहे. ऊस तोडणी मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. यामुळे ऊस वाहतूकदारांनी याला पर्याय म्हणून ऊस तोडणी मशीन खरेदी केल्या आहेत. मशीन खरेदी करत असताना अनुदान देण्याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकांनी घोषणा केलेली होती. महाविकास आघाडी व महायुती हे दोन्ही सरकार सत्तेत आले पण कोणीही प्रश्न मार्गी लावलेला नाही.
ऊस तोडणी मजूर हे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत. मजूरांच्या कमतरतेमुळे ऊसाचे गाळप पुर्ण करणे हे सरकार व कारखानदार यांच्यापुढे आव्हान निर्माण झालेले आहे. याकरिता शेतक-यांनी आपली जमीन, घर गहाण ठेवून कर्जे काढून मशीन खरेदी केलेले आहेत.  सरकारने या प्रश्नात लक्ष घालून तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील गळीत हंगाम सुरळीतपणे चालविणे राज्यातील साखर कारखानदार व सरकारला अडचणीचे ठरणार आहे. त्याबरोबरच हा निर्णय न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राज्यातील हजारो ऊस तोडणी मशीन घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे राजू शेट्टी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news