T20 World Cup|T20 विश्वचषक जिंकल्यानंतर PM मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद

हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादवचेही पंतप्रधानांकडून कौतुक
 T20 World Cup
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर PM मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.३०जून) भारतीय क्रिकेट संघाशी फोनवर संवाद साधला. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंशी त्यांनी T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. रोहित शर्माच्या शानदार कर्णधारपदासाठी त्यांनी अभिनंदन केले आणि त्याच्या टी-20 कारकिर्दीचेही कौतुक केले. विराट कोहलीच्या अंतिम सामन्यातील खेळी तसेच भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल मोदींनी विराटचेही कौतुक केले.

 T20 World Cup
T20 WC INDvsSA Final : भारत विश्वविजेता, द. आफ्रिका पुन्हा चोकर्स

पीएम मोदींनी हार्दिक पंड्याचे त्याच्या शेवटच्या षटकासाठी आणि सूर्यकुमार यादवचे त्याच्या झेलबद्दल कौतुक केले. त्याने जसप्रीत बुमराहच्या योगदानाबद्दलही जोरदार चर्चा केली. भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल पंतप्रधानांनी राहुल द्रविडचे आभारही मानले.

 T20 World Cup
T20 World Cup Final | टीम इंडिया जगज्जेता; दक्षिण आफ्रिकेला नमवले - फोटो

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news