Rohit Sharma Reveals Threat : रोहित शर्माचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाला; ‘टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान लढतीपूर्वी भारतीय संघाला धमकी..’

IND vs PAK T20 World Cup 2024 : धोका, धमकी आणि हॉटेलकैद... पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याचे ते भयाण वास्तव, रोहित शर्माच्या खुलाश्याने क्रिकेट विश्वात खळबळ
Rohit Sharma reveals there was a threat before the match against Pakistan in T20 World Cup 2024
Published on
Updated on

Rohit Sharma reveals threat before match against Pakistan in T20 World Cup 2024

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एका मुलाखतीत एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, भारतीय संघाला एका विशिष्ट धोक्यामुळे हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवण्यासही मनाई करण्यात आली होती, असे त्याने सांगितले. या घटनेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर असतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

रोहित शर्माने सांगितले की, भारत-पाकिस्तान सामन्यावेळी नेहमीच वातावरण तणावपूर्ण असते आणि खेळाडूंवर प्रचंड दडपण असते. मात्र, या सामन्यापूर्वी परिस्थिती अधिक गंभीर होती. आम्हाला सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेलमधून बाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, एक विशिष्ट प्रकारचा ‘धोका’ होता, ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

Rohit Sharma reveals there was a threat before the match against Pakistan in T20 World Cup 2024
IND vs AUS ODI : 'किंग' कोहली, 'हिटमॅन'चा करिष्मा! ऑस्ट्रेलियात 4 महिने आधीच वनडे सामन्यांच्या तिकिटांची रेकॉर्डब्रेक विक्री

एका कार्यक्रमात बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी आम्हाला सांगण्यात आले होते की, संघाला धमकी मिळाली आहे. त्यामुळे सामन्याच्या दोन दिवस आधीपासून आम्हाला हॉटेलमधून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. कोणताही खेळाडू हॉटेलच्या बाहेर जाऊ शकत नव्हता आणि त्यामुळे वातावरणात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. आम्ही रूममधूनच जेवण ऑर्डर करत होतो आणि संपूर्ण हॉटेल चाहते व मीडियाने इतके भरले होते की, तिथे चालण्यासाठीही जागा नव्हती. तेव्हा तुम्हाला कळते की हा इतर सामन्यांसारखा सामान्य सामना नाही, तर काहीतरी विशेष घडणार आहे. आम्ही स्टेडियमजवळ पोहोचताच भारतीय आणि पाकिस्तानी चाहते एकत्र नाचत होते आणि सर्वजण खूप आनंदी दिसत होते.’

रोहित पुढे म्हणाला, ‘मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अनेक सामन्यांमध्ये खेळलो आहे. या सामन्यापूर्वीची ऊर्जा आणि भावना खरोखरच खूप वेगळी असते. त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.’

भारताच्या या विश्वविजेत्या कर्णधाराच्या खुलाशामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांच्या भावना शिगेला पोहोचलेल्या असतात. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि यजमान देश विशेष काळजी घेत असतात. रोहितने सांगितलेला हा प्रसंग, मैदानाबाहेरही खेळाडूंना किती मोठ्या आव्हानांना आणि मानसिक दडपणाला सामोरे जावे लागते, हे स्पष्ट करतो.

Rohit Sharma reveals there was a threat before the match against Pakistan in T20 World Cup 2024
Team India Squad Changes : कर्णधार गिल कठोर निर्णयांच्या तयारीत! संघासाठी ‘ओझे’ ठरलेल्या ‘या’ खेळाडूला देणार डच्चू

या घटनेमुळे हे अधोरेखित होते की, खेळाडू केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही एका अदृश्य दबावाखाली वावरत असतात. रोहित शर्माच्या या वक्तव्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवरील गांभीर्य आणि भारत-पाकिस्तान सामन्याचे महत्त्व पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.

Rohit Sharma reveals there was a threat before the match against Pakistan in T20 World Cup 2024
IND vs ENG 2nd Test : दुस-या कसोटीसाठी संघ जाहीर! 4 वर्षांनी ‘या’ घातक गोलंदाजाचे पुनरागमन

भारताने जिंकला होता सामना

या सामन्यात ऋषभ पंतने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण 42 धावा केल्या होत्या, ज्यामुळे भारताला पाकिस्तानसमोर 120 धावांचे लक्ष्य ठेवता आले. रोहितने पंतच्या फलंदाजीचे कौतुक करत म्हटले की, या 42 धावा संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या.

टीम इंडियाकडून ऋषभ पंत व्यतिरिक्त अक्षर पटेलने 20 धावा केल्या, तर कर्णधार रोहित शर्माने 13 धावांची खेळी केली. या तीन खेळाडूंशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 10 धावांचा आकडा पार करता आला नाही. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 113 धावाच करू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 14 धावा देत 3 बळी घेतले, तर हार्दिक पांड्याने दोन गडी बाद केले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 31 धावा केल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news