Lord's Test Record : ऋषभ पंत क्लिन बोल्ड होताच रचला गेला इतिहास! 21व्या शतकात पहिल्यांदाच घडला असा विक्रम

IND vs ENG Lord's Test : कोणत्याही एका सामन्यात 14 फलंदाज त्रिफळाचीत होण्याची ही पहिलीच वेळ
Lord's Test Record : ऋषभ पंत क्लिन बोल्ड होताच रचला गेला इतिहास! 21व्या शतकात पहिल्यांदाच घडला असा विक्रम
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरल्यावर एखादा विक्रम घडला नाही, असे क्वचितच होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जे घडले, ते 21व्या शतकात प्रथमच पाहायला मिळाले. लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर ऋषभ पंत त्रिफळाचीत (बोल्ड) होताच एक नवा इतिहास रचला गेला. गेल्या जवळपास 25 वर्षांत प्रथमच असे काहीतरी पाहायला मिळाले, ज्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा मोठा वाटा ठरला.

Lord's Test Record : ऋषभ पंत क्लिन बोल्ड होताच रचला गेला इतिहास! 21व्या शतकात पहिल्यांदाच घडला असा विक्रम
Jasprit Bumrah New Record : बुमराहची विक्रमी कामगिरी; अनिल कुंबळेंना मागे टाकत रचला नवा कीर्तिमान

लॉर्ड्स कसोटीत 14 फलंदाज त्रिफळाचीत

लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू झाला, तेव्हा पुढे काय घडणार आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. या सामन्याच्या पाचव्या दिवशी, दुसऱ्या डावात ऋषभ पंत बाद होताच, या सामन्यात त्रिफळाचीत होणाऱ्या फलंदाजांची संख्या 14 वर पोहोचली. 2000 सालापासून म्हणजेच गेल्या जवळपास 25 वर्षांत कोणत्याही एका सामन्यात 14 फलंदाज त्रिफळाचीत होण्याची ही पहिलीच वेळ होती. या विक्रमात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या खेळाडूंचा समावेश आहे.

पहिल्या डावात दोन्ही संघांची धावसंख्या समान

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना आणखी एका कारणामुळे महत्त्वाचा ठरला, कारण दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावा केल्या; एकही धाव जास्त नाही आणि एकही धाव कमी नाही. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 387 धावा केल्या होत्या, त्यानंतर भारतीय संघानेही प्रत्युत्तरात 387 धावाच केल्या. एका क्षणी भारतीय संघ काही धावांची आघाडी घेईल, अशी अपेक्षा होती, परंतु त्याच धावसंख्येवर भारताचा डावही संपुष्टात आला. कसोटीच्या पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान धावसंख्या उभारण्याची घटनादेखील जवळपास 10 वर्षांनंतर घडली.

Lord's Test Record : ऋषभ पंत क्लिन बोल्ड होताच रचला गेला इतिहास! 21व्या शतकात पहिल्यांदाच घडला असा विक्रम
IND vs ENG Lord's Test : सिराजला ‘लॉर्ड्स’वरील आक्रमकता पडली महागात! ICCने ठोठावला आर्थिक दंड, डिमेरिट गुणाचाही फटका

मालिकेतील दोन सामने अद्याप बाकी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या दीर्घ मालिकेतील केवळ तीनच सामने झाले असून, अजून दोन सामने बाकी आहेत. मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टर येथे खेळवला जाईल. त्यानंतर अखेरचा सामना होईल. आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये आणखी कोणते विक्रम रचले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आतापर्यंत जे काही घडले आहे, त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती, त्यामुळे पुढे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news