T20 World Cup: पुढचे दोन्ही सामने जिंकले तरी भारत सेमीफायनलला जाणार नाही? टीम इंडिया संकटात

India’s Semi-Final Scenario: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी झालेल्या पराभवानंतर भारताची उपांत्य फेरीची वाट कठीण झाली आहे. पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आणि नेट रनरेट सुधारवणे आवश्यक आहे.
India’s Semi-Final Scenario Explained
India’s Semi-Final Scenario ExplainedPudhari
Published on
Updated on

India’s Semi-Final Scenario Explained: टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ मानला जात असलेला भारत अचानक अडचणीत सापडला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एवढ्या मोठ्या धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव झाला आहे. या धक्कादायक निकालाने भारताची विजयी मालिका खंडित झालीच, पण उपांत्य फेरीचा मार्गही कठीण झाला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही निराशाजनक झाली. गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली झुंज देत दक्षिण आफ्रिकेला 187 धावांवर रोखले होते. हा पाठलाग भारतासाठी अवघड नव्हता. मात्र या स्पर्धेत सुरुवातीपासूनच लय सापडत नसलेली भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली आणि संघ केवळ 111 धावांवर गारद झाला. परिणामी, दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला.

या पराभवानंतर भारत आता ‘करो या मरो’ स्थितीत पोहोचला आहे. सुपर-8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. भारताने पहिलाच सामना गमावला असल्याने आता पुढील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. भारताचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध, तर 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकले, तर भारताच्या खात्यात चार गुण जमा होतील.

मात्र केवळ दोन विजय मिळवणे पुरेसे ठरणार नाही. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यापैकी किमान दोन संघांनी आपले दोन सामने गमावणे भारतासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत भारत आणि आणखी एक संघ चार किंवा सहा गुणांसह पुढे जाऊ शकतील.

India’s Semi-Final Scenario Explained
IPL 2026 MS Dhoni: एमएस धोनी सर्व सामने खेळणार का? चेन्नई सुपर किंग्सकडून मोठी अपडेट!

जर या गटात तीन संघ चार-चार गुणांवर समान स्थितीत राहिले, तर निर्णय नेट रनरेटवर होईल. आणि इथेच भारताची अडचण आहे. 76 धावांच्या मोठ्या पराभवानंतर भारताचा नेट रनरेट -3.800 इतका घसरला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा +3.800 आहे. इतक्या मोठ्या फरकामुळे भारतासाठी पुढील सामन्यांत मोठ्या अंतराने विजय मिळवणे आवश्यक झाले आहे.

India’s Semi-Final Scenario Explained
T20 World Cup 2026| पाकिस्‍तानचा पाय खोलात..! उपांत्य फेरीच्या स्वप्नाला बसणार तडाखा?

आयसीसीच्या नियमानुसार, गुण समान असतील तर प्रथम विजयांची संख्या पाहिली जाते. तीही समान असल्यास नेट रनरेट निर्णायक ठरतो. त्यामुळे भारताने उर्वरित दोन्ही सामन्यांत केवळ विजयच नाही, तर शक्य तितक्या मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा सुपर-8 फेरीतूनच बाहेर पडण्याचा धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news