दिल्ली : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात आयर्लंडमध्ये खेळणार्या भारतीय संघाने पहिला सामना 7 गडी राखून जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सामना झाल्यानंतर व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये हार्दिक पंड्याने ऋतुराज गायकवाड सलामीला का आला नाही, याचा खुलासा केला. तो म्हणाला, ऋतुराजच्या पायाला दुखापत झाली होती. तरीदेखील आमच्याकडे जोखीम घेऊन त्याला सलामीला पाठवण्याचा पर्याय होता.
मात्र, मला हा पर्याय योग्य वाटला नाही. खेळाडूची तंदुरुस्ती सगळ्यात महत्त्वाची. मला वाटले की, आम्ही सामन्यातील परिस्थिती हाताळू. जी काही आमची बॅटिंग ऑर्डर आहे त्यापेक्षा एक क्रमांक वर सर्वांना फलंदाजी करावी लागले. ही काही फार मोठी डोकेदुखी नव्हती. आम्हाला ऋतुराजबाबत कोणताही धोका घ्यायचा नव्हता.
हेही वाचा