Kangana Ranaut Baba Ramdev: कंगना अन् रामदेबाबांचा वाद मिटला... मिठाई अन् मोठ्या भावाच्या प्रेमाचा केला स्विकार

Kangana Ranaut Baba Ramdev
Kangana Ranaut Baba Ramdevpudhari
Published on
Updated on

Kangana Ranaut Baba Ramdev Rakshabandhan: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्या मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत कंगना रनौत यांच्या एका विधानावरून रामदेव बाबांनी त्यांची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली होती, ज्यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. मात्र, रक्षाबंधनासारख्या सणाच्या पवित्र औचित्यावर हा सर्व वाद मागे सारत दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतले आहे.

Kangana Ranaut Baba Ramdev
Bollywood : “तुम्ही तुमच्या भावाला बिकिनीमध्ये राखी बांधता का?” कंगना रनौत क्रिती सेनॉनवर का संतापल्या

बाबा रामदेव यांनी पुढे केला मैत्रीचा हात

रक्षाबंधनानिमित्त प्रसारमाध्यमांसमोर बोलताना बाबा रामदेव यांनी कंगना रनौतसोबतचा आपला जुना वाद संपवत असल्याची घोषणा केली. "बहन कंगना रनौत यांना आपण पोस्टाने भेटवस्तू आणि मिठाई पाठवत आहोत. कोणत्याही कारणास्तव देशात किंवा कोणाहीमध्ये द्वेष किंवा वैरभावना नसावी. म्हणूनच आम्ही वैराचा त्याग केला आहे," असे रामदेव बाबांनी स्पष्ट केले. तसेच, आपण कंगना यांना फोन करून रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Kangana Ranaut Baba Ramdev
'देशाची किती मोठी फसवणूक करत आहेत...', कंगना रनौत यांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल

कंगना रनौतने स्वीकारली योगगुरूंची प्रेमळ भेट

बाबा रामदेव यांच्या या दिलखुलास भूमिकेनंतर अभिनेत्री कंगना रनौतनेही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत कंगना म्हणाली की, "सणाचा दिवस हा सर्व चुका माफ करण्यासाठीच असतो. माझे मोठे बंधू बाबा रामदेवजी यांनी अत्यंत योग्य म्हटले की, वादापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे. आज रक्षाबंधनानिमित्त मी त्यांची मिठाई आणि मोठ्या भावाचे प्रेम, या दोन्ही गोष्टी स्वीकारते. खूप-खूप धन्यवाद, ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो."

Kangana Ranaut Baba Ramdev
पहिला चहा | कंगना व्हर्सेस प्रियांका

काय होता नेमका वाद?

काही दिवसांपूर्वी कंगना रनौतने एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कंगना यांची मानसिक स्थिती ठीक नसून त्यांच्यावर पक्षाने कारवाई करायला हवी, असे रामदेव बाबांनी म्हटले होते. तसेच त्यांच्या बालपण आणि शिक्षणाविषयीही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, ज्यामुळे कंगना बऱ्याच नाराज झाल्या होत्या. अखेर रक्षाबंधनासारख्या सणाच्या निमित्ताने हा संपूर्ण वाद गोडोपवाड्याने संपला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news