Vivek Oberoi Birthday : विवेक ओबेरॉयने वाढदिवसादिवशी २० वर्षानंतर ऐश्वर्या रायबद्दल सोडले मौन, म्हणाला...
पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या विवेक ओबेरॉयची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहीली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांचे ब्रेकअप लपलेले नाही. दोघांच्या ब्रेकअपची खूप चर्चा झाली होती. दोघे वेगळे होण्याचे कारण ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, 20 वर्षांनंतर विवेक ओबेरॉयने मौन तोडले आहे. त्याने सांगितले की ब्रेकमूळे त्याचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाले होते.
काम मिळत नव्हते!
एका मुलाखतीत विवेकने त्याच्या वाईट काळाबद्दल सांगितले. ताे म्हणाला की, त्याचा संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान वाटतो. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा इंडस्ट्रीतील अनेक लोकांना त्याचे करिअर बरबाद करायचे होते. त्यानंतर शूटआउट अॅट लोखंडवाला हा चित्रपट आला. या चित्रपटातील माझ्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि त्यासाठी मला पुरस्कारही मिळाले. परंतु असे असूनही मला काम मिळेना. जवळपास 1 ते 2 वर्ष घरी होतो. कोणतेही चित्रपट मिळले नाहीत.
तुमच्यात टॅलेंट असेल तर ते दुसऱ्यांमुळे वाया घालवू नका : विवेक ओबेरॉय
ऐश्वर्या रायमुळे त्याच्या करिअरवर परिणाम झाला का, असा प्रश्न त्याला विचारला असता त्याने उत्तर दिले की, ‘मला यावर काहीही बोलायला आवडणार नाही. पण मी एक नक्कीच सांगू इच्छितो की तुमच्यात टॅलेंट असेल तर ते दुसऱ्यांमुळे वाया घालवू नका. जर तुमचा पार्टनर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये समस्या निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे. मात्र, आता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चन आपापल्या कुटुंबासोबत चांगले आयुष्य जगत आहेत. आता त्यांच्यात कोणतेच वाद-विवाद नाहीत. तसेच ते अनेक ठिकाणी एकत्रही दिसत आहेत.
.हेही वाचा
आर माधवनला दुहेरी आनंद; सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कारासह मिळाले…
OTT: मार्चमध्ये मनाेरंजनाची मेजवानी; ‘ओटीटी’वर प्रदर्शित होणार ‘या’ वेब सीरिज
हेमा मालिनीने सनी देओलचा गदर २ पाहिला, दिली अशी प्रतिक्रिया…