bigg boss marathi : तृप्तीताई नुसतं सगळं कॅमेऱ्यासाठी करतात : गायत्री | पुढारी

bigg boss marathi : तृप्तीताई नुसतं सगळं कॅमेऱ्यासाठी करतात : गायत्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ( bigg boss marathi ) “संयमाची ऐशी तैशी” हे साप्ताहिक कार्य आज रंगणार आहे. या कार्यामध्ये कोणाचा संयम तुटणार? कोण संयमाला धरून चालणार? हे आजच्या भागामध्ये समजणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टास्क दरम्यान आज गायत्री आणि विकासने तृप्तीताईंना खडेबोल सुनाविले आहे.

या टास्कवेळी गायत्री म्हणाली, ‘तृप्तीताईंना तर काहीच करता येत नाही. नुसतं सगळं कॅमेऱ्यासाठी त्या करतात. सगळं biased करायचे.’ यावर तृप्तीताई म्हणाल्या ‘मला बांधू द्या… तुम्ही म्हणाल तसं’.

गायत्रीने यापुढे ‘आम्ही राक्षस नाही, तुम्ही राक्षस आहात. खरंतर तर त्या स्वत: ला देवदूत समजतात. पंरतु, एक साधा महामेरू बांधता येत नाही त्यांना, या कसल्या देवदूत?’ असे म्हटले आहे.

तर याच दरम्यान विकास आणि गायत्री दोघांनी मिळून नीट महामेरू बांधता पण येत नाही, फक्त खोट बोलतात तृप्तीताई. त्या नाही या टीमकडून वाटतं. त्या टीमकडूनसोबत आहेत का? असे त्यानी म्हटले आहे.

बघूया आता विकास आणि गायत्रीच्या या बोलण्यावर तृप्तीताई संयम दाखवतील की उत्तरं देतील. जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी ( bigg boss marathi ) सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची? पुरूष लावणी कलावंताची कहाणी

Back to top button