ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शनिवारी (दि.१८) सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी १२ वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोल्हापूर- कळंबा येथील शिवप्रभू नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे.

भालचंद्र कुलकर्णी : ३०० हून अधिक चित्रपटात काम
भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी (१९८३), मासूम (१९९६), झुंज तुझी माझी (१९९२), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), माहेरची साडी (१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.
कुलस्वामिनी अंबाबाई चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणं त्यांच्या चित्रित झाले होते. हे गाणे खूप गाजलं होतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रसृष्टी पोरकी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजलीॐ शांती pic.twitter.com/RcWUVv8NyI
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 18, 2023
हे ही वाचा :
- Sonali Kulkarni : ‘मुली आळशी, बॉयफ्रेंडवर दबाव टाकत असतात’
- सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीपच्या आईची होणार धमाकेदार एन्ट्री
- Nana Patole : तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका ! नाना पटोले