'मी पुन्हा येईन' : राजकारणातील सत्ता बदलाची वेब सीरिज येतेय
पुढारी ऑनलाईन डेस्क : मी पुन्हा येईन नावाची मराठी वेबसीरीज येणार आहे. याविषयी अरविंद जगताप यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे-मागच्या वर्षी दिग्दर्शक म्हणून केलेली पहिली सीरिज. वास्तवाशी संबंध नाही. वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीवर पोचणं अशक्य आहे. हे एका सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलेलं राजकारण. राजकारणात काही खरं नाही हेच खरं , हे हसत खेळत सांगणारी”. हे सांगताना अरविंद यांनी वास्तवाशी संबंध नाही, असेही नमूद केले आहे. ‘मी पुन्हा येईन’ असे सीरीजचे नाव असून अरविंद यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मी पुन्हा येईन’ या सीरीजमध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार आहे, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
नव्या वेबसीरीजमध्ये काय असेल, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. मी पुन्हा येईनचे दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. लेखनही त्यांचेच आहे. प्लॅनेट मराठी हे सीरीज प्रदर्शित करणार आहे. अरविंद यांनी काल ट्विटरवर या सीरीजविषयी माहिती देत एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. यावरून राजकारणावर आधारीत हा चित्रपट आहे, असे वाटते. ‘रानबाजार’ या वेबसिरीजच्या यशानंतर आता प्लॅनेट मराठी आता ‘मी पुन्हा येईन’ ही वेब सीरिज आणत आहे.
मी पुन्हा येईन.
मागच्या वर्षी दिग्दर्शक म्हणून केलेली पहिली सिरीज. वास्तवाशी संबंध नाही. वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीवर पोचणं अशक्य आहे. हे एका सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलेलं राजकारण .
राजकारणात काही खरं नाही हेच खरं , हे हसत खेळत सांगणारी” pic.twitter.com/NueqDfuvXn— Arvind Jagtap (@arvindj3) July 11, 2022
मराठी अभिनते भारत गणेशपुरे यांची या सीरीजमध्ये भूमिका आहे. पण, ते कोणत्या भूमिकेत दिसतील, याविषयी माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. अरविंद जगताप यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या वेब सीरीजविषयी माहिती दिलीय. या पोस्टनंतर नेटकऱ्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत. भुमिपुत्रच लिहु शकतो हे 👏❤️, Congratulations sir, अभिनंदन सर,,,❤️❤️, सर आने दो 👏, This Content is amazing!, वाह ही काळाची गरज आहे सर, खरं आहे कारण सध्या राजकारणात काय चालय यांचा काही नेम नाही कधी सरकार पडतंय तर कधी पुन्हा नव्याने उभा राहत्या; पण प्रत्येक सर्वसामान्य जनतेला अस वाटत आहे की, आज काय होईल उद्या काय होईल मात्र ते सर्व जण आपापल्या परीने सर्व मस्त आहेत यात आपला सर्वसामान्य माणूस भरडत चालला आहे. या साठी तुम्ही ही सीरिज घेऊन येत आहेत आणि ती खरंच यातून काहीतरी शिकवले आणि राजकारण आणि समाजकारण सर्वसामान्य माणसाला दाखवून द्याल ही इच्छा सर खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🙏❤️ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडिओला दिल्या आहेत.
व्हिडिओत ‘मी पुन्हा येईन’ असे भारत गणेशपुरे यांच्या तोंडी वाक्य आहे. त्यामुळे या सिरीजचा टीझर प्रदर्शित होताच या सिरीजची जोरदार चर्चा सुरु झालीय.
हेही वाचा :
- धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- भोसरी : पीएमपी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा; बसमध्ये विसरलेली बॅग महिलेला केली परत
- हिंजवडीतील कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन सरसावले; पुण्यावरून येणारी वाहतूक सूस-म्हाळुंगे मार्गाने वळविण्याचा प्रयत्न
View this post on Instagram