रायगड जिल्ह्यातील १७ धरणे १०० टक्के भरली

रायगड जिल्ह्यातील १७ धरणे १०० टक्के भरली
Published on
Updated on

रोहे (जि. रायगड); महादेव सरसंबे : रायगड जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांसह सारेच धास्तावले होते. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने रायगड जिल्ह्यातील निम्याहून जास्त धरणे भरली आहेत. रायगड जिल्ह्यात २८ पैकी १७ धरणे १०० टक्के भरली आहेत. तीन धरणात पाणी साठ्यात वाढ होवून १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील सर्वात कमी पाणी साठा श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात (३३ टक्के) उपलब्ध आहे.

रायगड : १७ धरणे १०० टक्के भरली

रायगड जिल्ह्यातील २८ धरणांचा विचार करता असाच पाऊस राहिल्यास लवकरात सर्व धरणे १०० टक्के भरतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात १४ जुलै पर्यंत जिल्ह्यातील धरणांचा विचार केल्यास धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडल्याने चांगला पाणी साठा जमा झाला आहे. रायगड जिल्ह्यात धरणांचा पाणीसाठा पाहता फणसाड (ता. मुरुड) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, वावा (ता. तळा) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा,  सुतारवाडी (ता. रोहा) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, आंबेघर (ता. पेण) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, श्रीगाव (ता. अलिबाग) धरण क्षेत्रात अद्याप पाणी साठा ५० टक्या पेक्षा कमी असून आता ४५ टक्के पाणी साठा आहे. कोंडगाव (ता.सुधागड) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, घोटवडे (ता. सुधागड) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, ढोकशेत (ता.सुधागड) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, कवेळे (ता.सुधागड) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, उन्हेरे (ता.सुधागड) धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, कार्ले (ता.श्रीवर्धन) धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी असून आता ५८ टक्के पाणी साठा आहे. कुडकी धरण भरण्याच्या मार्गावर असून ९८ टक्के पाणी धरण क्षेत्रात आहे.

सर्वात कमी पाणी साठा रानीवली धरण क्षेत्रात

रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाणी साठा रानीवली (ता. श्रीवर्धन) धरण क्षेत्रात ३३ टक्के आहे. पाभरे (ता. म्हसळा) धरणात क्षेत्रात पाणी साठा १०० टक्के, संदेरी धरणात क्षेत्रात पाणी साठा १०० टक्के, वरंध (ता.महाड)  धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, खिंडवाडी धरण भरण्याच्या मार्गावर असून आता या धरण क्षेत्रात ९९ टक्के पाणी साठा आहे. कोथुर्डे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, खैरे धरण क्षेत्रात ८८ टक्के पाणी साठा, कर्जत तालुक्यातील साळोख धरणात क्षेत्रात पाणीसाठा कमी असून आता या धरण क्षेत्रात ५३ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. अवसरे धरण क्षेत्रात ७९ टक्के पाणी साठा, भिलावले (ता. खालापूर)  धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा, डोणवत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा आहे. मोरबे (ता.पनवेल)धरण क्षेत्रात ७७ टक्के पाणी साठा, बामणोली धरण क्षेत्रात ९४ टक्के पाणी साठा, उसरण धरण क्षेत्रात १०० टक्के पाणी साठा तर पुनाडे (ता.उरण) धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी असून आता ५९ टक्के पाणी साठा आहे. रायगड जिल्ह्यातील १७ धरणातुन कमी जास्त पाण्याचे विसर्ग सुरू आहे. पाऊस असाच कायम राहील्यास जिल्ह्यातील उर्वरित धरणे लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने भरतील.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news