स्वराज्याची पहिली राजधानी राजगड जूनपासून अंधारात ; वीजबिल मात्र दर महिन्याला

स्वराज्याची पहिली राजधानी  राजगड जूनपासून अंधारात ; वीजबिल मात्र दर महिन्याला
Published on
Updated on

वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार सर्वांत अधिक काळ पाहिलेल्या, स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड 1 जूनपासून विजेअभावी अंधारात आहे. मात्र, गडाला वीजपुरवठा करणार्‍या वीजवाहिन्यांवर झगमगाट दिसून येत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे गडाचा वीजपुरवठा बंद असताना पुरातत्व खात्याला वीजबिल मात्र दर महिन्याला येत आहे.

एकही युनिट वीज वापर नसतानाही ऑगस्ट महिन्यात 11 हजार 320 रुपये वीजबिल आले आहे. राजगडावरील डागडुजीची कामे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू होती. तोपर्यंत गडावर वीजपुरवठा कसाबसा सुरू होता. मात्र, 1 जूनपासून गडावरील वीज बंदच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज राजसदर, पद्मावती मंदिर, पुरातत्व कार्यालय परिसर अंधारात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news