पीक विम्यासाठी फक्त एक रुपया द्यावा; कृषी विभागाचे आवाहन

Crop Insurance
Crop Insurance
Published on
Updated on

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयात पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे. शेतकर्‍यांनी याव्यतिरिक्त पैसे देऊ नये, असे आवाहन हवेली तालुका कृषी विभागाने केले आहे. शेतकर्‍यांकडून जादा पैसे घेऊ नयेत अशा सूचना ई सेवा केंद्र चालकांना करण्यात आल्या आहेत. यासाठी ई सेवा केंद्राची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले, शासन एका शेतकर्‍याच्या पीक विम्यासाठी 40 रुपये देणार आहे. ई सेवा केंद्रचालक शेतकर्‍यांकडून अतिरिक्त पैशांची मागणी करीत असल्यास शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी. तीन वर्षांसाठी अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे.

यात शेतकर्‍यांना केवळ 1 रुपया भरून सहभागी होता येत आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय पोर्टलवर स्वत: शेतकर्‍यांना, तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक ई सेवा केंद्र यांच्यामार्फत नोंदणी करता येणार आहे. हवेली तालुक्यात एक लाखाहून अधिक शेतकरी आहेत. त्यातील पंचवीस हजारांहून अधिक शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तालुक्यात दीडशेहून अधिक ई सेवा केंद्र आहेत. 31 जुलैपर्यंत शेतकर्‍यांना पीक विमा नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news